- ·
जगाच्या
इतिहासात महाराज हे सगळ्यात महान आहेत असे मानतो
- ·
पाऊस
आला कि भिजलेल्या मातीच्या वासाची आणि ओलसर ढगांमध्ये सिंहगडावरच्या (अथवा कुठल्याही सह्याद्रीतल्या डोंगरावरील)
कांदा भाजी गरम चहा ची आठवण काढतो
- ·
चार
मित्र गोळा झाले कि अमक्या किंवा तमक्या गडावर ट्रेक चा प्लॅन करतो
- ·
उन्हाळ्यात
हिमालय ट्रेक व त्याच्या तय्यारी साठी पर्वतया 'करतो '
- ·
दोन
किंवा तीन वाक्यातून एकतरी पुलं चा विनोद टाकतो
- ·
मृत्युंजय
, स्वामी, राजा शिवछत्रपती, छावा , पानिपत , श्रीमानयोगी ची पारायणे करतो
- ·
मधूनच
एखाद्या रविवारी शांतेचे कार्टे , सौजन्याची, वासूची सासू, गेला माधव, वस्त्रहरण नाटकांच्या
dvds बघतो
- ·
बालगंधर्व,
प्रभात, बाबूजी, गदिमा, कुसुमाग्रज, भीमसेन, मंगेशकर परिवार, खळे यां
पासून, लागू, फुले , घाणेकर, लक्ष्या
अशोक, भरत, दामले सिद्धार्थ, सुबोध,
महेश काळे ह्या सारख्या असंख्य कलाकारांच्या
आठवणी काढतो
- ·
त्याला
लहानपणी गणपतीत, शाळा कॉलेज गॅथेरिन्ग , पुरषोत्तम, कामगार कल्याण, राज्यनाट्य मध्ये
केलेल्या भूमिकेचे डायलॉग पाठ असतात व एकदा
तरी बालगंधर्व, भारत , यशवंतराव किंवा टिळक च्या स्टेज वर पाय ठेवतो
- ·
जगात
कुठेही ट्रिप ला गेलो तरी त्या महाबळेश्वर कोकण, लोणावळ्या च्या ट्रीपची आठवण काढतो
- ·
परीक्षेला
किंवा महत्वाच्या मीटिंगला दगडूशेठ, विठोबा ,अंबाबाई, खंडोबा, मारुती ,स्वामी समर्थ,
साईबाबा, गल्लीतल्या मंदिरातला देव मनात ठेवतो
- ·
फक्कड
जेवणची सुरवात वरण भात तूप व लिंबू पिळून करतो
- ·
पुण्याहून
मुंबई ला जाताना दिवाडकरांचा किंवा दत्त चा वाडा खाऊनच प्रवास पूर्ण करतो
- ·
भेळ
हि फक्त पुण्यातच (सारसबाग, कल्पना, पुष्करिणी किंवा गणेश) कडेच मिळते, इतर ठिकाणी जो पदार्थ चौपाटीवर किंवा स्टॅन्ड वर भेळ म्हणून विकतात त्याला भेळ म्हणत
नाहीत असे मानतो
- ·
श्रीकृष्ण
ची मिसळ, सुजाता ची मस्तानी, आप्पाची खिचडी, संतोष चे पॅटिस, चितळ्यांचे दूध आणि इतर
milk प्रॉडक्ट्स, जयश्री ची पावभाजी a one ची बिर्याणी चव अजूनही पाठ ठेवतो .
- ·
गोव्याला
मासे खाण्या अगोदर तांबडा पांढरा खायला कोल्हापूरला
थांबतो.
- ·
लग्नात
कितीही पंच तारांकित स्टॉल्स, बुफे असले तरी
पंक्तीतला जिलेबी चा आग्रहात जास्त रमतो
- ·
पिकॅडली
किंवा मॅनहॅटन ला असला तरी सारसबाग पेशवेपार्क एरिया त मजा जास्त केली असे मान्य करतो
- ·
कॅम्प
, कोरेगावपार्क हि बाहेरगावी असतात असे मानतो. fc रॊड हा गावात येतो कारण तिथे वैशाली आहे
- ·
सिग्नल्स
पाळणारी परदेशी माणसे बावळट आहेत असे मानतो
- ·
एक
रुपये देऊन भाड्याने आणलेल्या सायकल शिकल्याचा अनुभवातून जगात बोईंग विमान चालवायचा
कॉन्फिडन्स घेतो
- ·
कुठल्याही
उपनगरत घर घेतले तरी महिन्यातून एकदातरी , आणि बाहेरगावी किंवा बाहेरदेशी असल्यास प्रत्येक
घरच्या वारीस गेल्यावर लक्ष्मी रोड, मंडई आणि
तुळशीबागेत शॉपिंग करतो
- ·
आयष्यात
असंख्य night out मारल्या तरी गणपती बघण्यात घालवलेल्या night out सगळ्यात आठवतात
- ·
घरात
गणपती बसवतानाचा उत्साह आणि विसर्जनाला लागणारी
हुरहूर शब्दात व्यक्त करू शकत नाही
- ·
शास्त्रीय
संगीतातले फारसे न कळता आपण सवाई ला कसे नेहमी जातो हे सगळ्यांना सांगतो.
- ·
तीन
ते चार जुनी नवी मराठी गाणी तोंडपाठ करतो कारण ती भेंड्या खेळताना भाव खायला उपयोगी
पडतात
- ·
तेंडुलकर
गावस्कर हे स्वर्गातले देव मानतो.
- ·
दिवाळीत
कुठेही असलो तरी नरक चतुर्दशी च्या पहाटे सारसबागे ला मिस करतो
- ·
ईदचा
मसूदभाईंनी पाठवलेला शीरखुर्मा किंवा कॅम्पात क्रिसमस त्याला तितकाच आवडतो
- ·
चौथी
आणि सातवीत स्कॉलरशिप किंवा दहावी बारावी ची मेरिट लिस्ट हि हार्वर्ड डिग्री पेक्षा महत्वाची मानतो
- ·
असंख्य
वाद विवाद , गप्पा, भांडणे नाटके करण्यातील
वाचिक अनुभवामुळे सॉफ्टवेअर मधील करिअर मध्ये इतरांपेक्षा उजवा ठरतो कारण तेथे तेच
महत्वाचे असते .
- ·
कस्टमर
म्हणून झालेला अपमानाचा तो क्लायंट ला मॅनेज
करून (गुंडाळून ) बदला घेतो
- ·
वसंत
व्याख्यानमाला, निवडणुकांतील भाषणे आणि मॅजेस्टिक
गप्पा ऐकल्या च्या अनुभवरून कित्येक सेमिनार्स/कॉन्फेरेंन्सस गाजवतो
वरील सगळे
कुणी
किती
हि
वेळा
लिहिले
वाचले
असले
तरीही
परत
आपले
विचार
म्हणून
सोशल
मीडिया
वर टाकतो
Though it might sound cliche , On this Rainy spring morning its but natural to thrive on Nostalgia over a steaming cuppa of chai. I hope many friends would appreciate few final points relevant to common thread professionally.
No comments:
Post a Comment